Karmvir Bhaurao Patil Shikshan Prasarak Mandal
कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ’नांदेड’ संस्थेची पार्श्वभूमी
संवाद वाहिनी प्रकल्प
प्रास्ताविक
वृद्धत्व हे नैसर्गिक शारीरिक अवस्था परंतु याचा स्वीकार व्यक्ती करत नाही हे सामजिक वास्तव आणि वृधांच्या समस्याचे मूळ कारण ही अवस्था वयाच्या 60 व्या वर्षी सुरू होते . अर्थातच वृद्ध व्यक्तीचे ढोबळ व्याख्याच 60 अधिक वयाची व्यक्ती अशी करता येईल . खरेतर धावत्या जगाचा आढावा घेता हे कमी झाले आहे म्हणजे वृद्धत्वाच्या खुणा आता 50 पासून सुरू होतात पण लोकांना याचा स्वीकार नाही . वृद्ध अवस्था ही नैसर्गिक आहे ते एका टप्प्यावर येणार परंतु त्याचा अस्वीकार अनेक प्रश्न निर्माण करत शारीर लवकर थकते काही अवयव काम करणे कमी करतात उदा . दात पडणे , ऐकू कमी येणे , चष्मा लागणे किंवा मोती बिंदू डोळ्याचे इतर आजार गुडघ्यांचा त्रास , केस पिकने / पांढरे होणे अशा अनेक व्याधींची सुरवात म्हणजे वृद्धत्वाची सुरवात . माज्याकडे काहीतरी कमी आहे किंवा मी कमी पडतो ही भावना माणसाला असुरक्षित करते आणि तिथून मानसिक भावनिक समस्या निर्माण होतात . आपण कमी आहोत , आपण आवलंबून आहोत , आपल्याला मदत लागते , एकेकाळी सगळी सूत्रे कारभार करणारा माणूस स्वत;ची वैयक्तिक कामे स्वत; करू शकत नाही ही भावना व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण करणारी आहे . त्यमुळे वृद्ध व्यक्तीची आपोआप चीडचीड होते . आपलं कोणी ऐकत नाही , आपल्याला कोणी जुमानत नाही , आपली दखल घेतली जात नाही , आपल्याला किंमत नाही , आपण नकोशे झालो आहोत असे अनेक भावना या वृद्धांच्या मनात घोळत असतात त्याना सामुजून घेणे आवश्यक आहे . घरातील माणसं समजून घेतातच असे नाही.
घरातील सर्व व्यक्ती जाणीव पूर्वक दुर्लक्ष करतात असे नाही पण कामाच्या दगदगीत आणि धकाधकीच्या आयुष्यत न कळत दुर्लक्ष होत पण ते एकेकाळी हुकुम चालणाऱ्या व्यक्तीच्या मनाला लागत खूप खोलवर मनाची जखम जाते काही लोक व्यक्त होतात काही होत नाहीत जे लोक व्यक्त होतात तेंव्हा काही कौठूबिक बेबनाव निर्माण होतात पण त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केल्याने ते मोकळी होतात परंतु जे लोक व्यक्त होत नाहीत सतत मनात झुरतात त्यांना अनेक मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते . योग्य वेळी मदत मिळाली नाही तर समस्या वाढत नाहीत पण मदत नाही मिळाली तर समस्या वाढतात जाठील होतात परिणामी व्यक्तीवर अधिक मानसिक ताण वाढतो परिणामी नात्यांवर दूरगामी परिणाम होतात . वृद्धत्व ही अवस्था न मानता काही लोक त्याकडे समस्या म्हणून पाहतात हे होऊ नये या साठी वृद्ध व्यक्तीसोबत नीट समजून उमजून संवाद केला पाहिजे . एक मोकळी जागा निर्माण केली पाहिजे त्यांना व्यक्त होता येईल मदत मिळवता येईल बोलता येईल. अशा जागा अनेक लोकांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे अनेक ठिकाणी वृद्धांसाठी वृद्धाश्रम आहेत परंतु भारत देशामध्ये वृद्धाश्रामाना एक सामजिक कलंक समजले जाते . मुलांना वाढवण्यासाठी आई बापानी खूप काबाड कष्ट केलेले असतात आणि मुले आईवडीलाना वृध्श्र्मात ठेवतात हे समाजाला न पटणारे आहे. अगदी साहजिक पण आहे.केवळ जबाबदारी नको म्हणून आईवडीलाना अश्रामात टाकणाऱ्या मुलांना कायद्याने शिक्षा व्हावी . तशी आई वडीलाना पोटगी मिळण्याची कायदेशीर तरतूद आहे सुद्धा अर्थात त्याचा खूप कोणी वापर करत नाही.
पण प्रत्येक वेळी बेजबाबदार मुले असेच कारण असते असे नाही काही वेळेला मुले कामानिमित्त मोठ्या शहरात जातात किंवा परदेशी जातात त्यावेळी आई वडीलाना शहारातील अथवा परदेशातील वातावरण सहन होत नाही किंवा मन लागत नाही . काहे ठिकाणी मुलागा सून दोघेही कामाला जातात आणि काळजी घेण्यासाठी घरी कोणी नसत . काहीवेळा असे होती कि आई वडील आपण आणि मुले अशी तीन पिडीचे लोक एकत्र राहतात तेंव्हा संस्कृतीचा संघर्ष होतो आज्जी आजोबा नातवांना वावरताना असे वावर तसे वाग कपडे असे घाल , लवकर घरी ये असे अनेक बंधने टाकली जातात जे नव्या पिढीला अजिबात आवडत नाही त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने येतात यावरून घरात खटके उडतात . ही परिस्थिती कंट्रोल करण्यसाठी पण अज्जी अजोबा याना वृधाश्रमत ठेवले जाते, पाळणा घर ही कल्पना तुलनेने समाज स्वीकारतो पण वृद्धाश्रम ही कल्पना लोकांना हवी आहे पण स्वीकार नाही. अनेक घरांमध्ये असे अनेक वाद असतात जे मिटवण्यासाठी लोक आपल्या घरातील वृद्धांना आश्रमात टाकतात . अशा प्रश्नांना उत्तर शोधण्याच्य हेतूने आम्ही एक प्रकल्प घेऊन येतोय तो म्हणजे फिरते समुपदेशन केंद्र संवाद वाहिनी
यातून आपण वृद्धांच्या समस्यांना तर न्याय मिळणारच पर्यायाने घरातील सर्व सदश्यांना पण मोकळे वाटेल.
प्रकल्पाची गरज का वाटते ?