Karmvir Bhaurao Patil Shikshan Prasarak Mandal
‘कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्था शिक्षण प्रसारक मंडळ’नांदेड ही संस्था 1980 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वैचारिक प्रेरणेतून स्थापन झाली. संस्थेच्या उद्देश पत्रिकेत अनेक उद्देश आहेत त्यापैकी वंचीत घटकाचे सक्षमीकरण आणि पुनर्वसन हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मुकबधीर मुलांसाठी शाळा सुरू केली . या काळात या कामासाठी सहसा कोणी पुढे येत नसत परंतु संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काळाच्या दोन पावले पुढचा विचार करत कर्मवीर भाऊराव पाटलांचा वारसा चालवत उमरगा तालुक्यातील पहिले मुलींचे वास्तीगृह सुरू केले . ‘ तुळजा भवानी ‘ वसतीगृहस महाराष्ट्र शासनच्या समाज कल्याण विभागांतर्गत 29 मार्च 1981 रोजी अनुदान तत्वावर मान्यता प्रधान करण्यात आली . या वास्तीग्रहात आजपर्यंत 43 वर्षात 1500 वंचित मुलीनी याचा लाभ घेतला. अजूनही हे वसतीगृह तितक्याच सक्षमतेने चालू आहे . मुलीचे व्यक्तीमहत्व घडवण्यात या वास्तीगृहाचा मोलाचा वाटा आहे. वसतीगृहाच्या माध्यामतून शासकीय व्यवस्थेकडून मिळणाऱ्या मदतीतून मुलींची राहण्याची आणि जेवणा खाण्याची उत्तम सोय आहे . लोकसहभागातून मिळनाऱ्या देणगीतून मुलीना सर्व प्रकाराचे शैक्षणिक साहित्य आणि गणवेश देण्यात येतो.